Ajit Pawar । लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपावर सध्या मॅरॅथॉन बैठका होत आहेत. त्यातच महायुतीत मनसेला सामील करून घेण्यासाठी भाजप आणि मित्रपपक्षाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आज राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांसोबत बैठक करत आहेत. तर, दुसरीकडे राज्यातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार दाखल झालेत. राज्यातील काही जागावर तोडगा काढण्यासाठी चर्चा होण्याची शक्यता आहे.
जागावर तोडगा काढण्यासाठी चर्चा ? Ajit Pawar ।
महायुतीमधील जागावाटपाच्या अंतिम बैठका होत आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर अजित पवार दाखल झाले आहेत. काही जागांबाबत एकमत झाले नसल्याने यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक होत असल्याची माहिती समोर येत आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार देखील या बैठकीत सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहेत.
मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज मुंबईतल्या सर्व खासदार आमदार यांची बैठक बोलावली आहे. त्या आधी ते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहचले आहेत. याचवेळी अजित पवार देखील या ठिकाणी पोहचले आहेत. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
राज्यात नवीन राजकीय समीकरण ? Ajit Pawar ।
राज्यात कधी नव्हे असे राजकीय समीकरण मागील पाच वर्षात पाहायला मिळाले. एकेमकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात आघाडी झाली. त्यामुळे राज्यात पहिल्यांदाच शिवसेना आणि काँग्रेससह राष्ट्रवादीचे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. पुढे शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे शिवसेना- भाजप सरकार स्थापन झाले. पण भाजपसोबत पहिल्यांदाच अजित पवारांच्या रूपाने राष्ट्रवादी भाजपसोबत एकत्रित सरकारमध्ये आल्याचे पाहायला मिळाले.