Aishwarya Rai – अभिषेक बच्चन ( Abhishek Bachchan ) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन ( Aishwarya Rai ) यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये चर्चेत आहेत. दोघांचा कथितपणे घटस्फोट झाला असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात सगळे काही ठिक नसल्याच्या बातम्या आहेत.
मध्यंतरीच्या काळात स्वत: अमिताभ बच्चन यांनीही सोशल मीडियावर अशा काही पोस्ट शेअर केल्या आहेत की त्यामुळे ऐश्वर्या आणि बच्चन कुटुंबात निर्माण झालेल्या दुराव्याच्या चर्चांना खतपाणीच घातले गेले. मात्र आता ऐश्वर्याने बच्चन कुटुंबाचे घर सोडले असून ती तिची आई वृंदा राय यांच्याकडेच राहायला आली असल्याच्या बातम्या काही माध्यमांनी अगदी छातीठोकपणे दिल्या आहेत.
ऐश्वर्या आणि तिची मुलगी आराध्या यांनी जलसा हा बच्चन कुटुंबाचा बंगला सोडला असून त्या आता वृंदा राय यांच्या घरी शिफ्ट झाल्या आहेत. दरम्यान, एका माध्यमाने आणखीच गोंधळ वाढवणारी बातमी दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जरी ऐश्वर्या आईकडे राहायला आली असली तरी ती आईला आणि पती अभिषेक यांनाही समान वेळ देते आहे. ऐश्वर्याने केवळ बच्चन कुटुंबाचे घर सोडले आहे.
मात्र ती अजूनही तिच्यापतीसोबतच राहते आहे. काही माध्यमांच्या म्हणण्यानुसार ऐश्वर्या आणि तिच्या सासूचे अर्थात जया बच्चन यांचे बिनसले असून त्यामुळे गृहकलह निर्माण झाल्यामुळेच तिने आईच्या घरचा रस्ता पकडला. ऐश्वर्याची नणंद श्वेता नंदा कायमस्वरूपी जलसा या बच्चन कुटुंबीयांच्या बंगल्यात शिफ्ट झाल्यामुळे ही भांडणे सुरू झाल्याचाही दावा केला गेला आहे. तसेच जरी ती आता घरातून बाहेर पडली असली तरी अभिषेकशी घटस्फोट घेणार नसल्याचेही सूत्रांच्या हवाल्याने दावे केले गेले आहेत.
काही दिवसांपूर्वीच द आर्चिज या चित्रपटाच्या खास शोच्या वेळी ऐश्वर्या आणि अभिषेक एकत्र दिसले होते. या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या अनेक स्टार किडस्ने पदार्पण केले असून श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्यही याचेही पदार्पण झाले आहे. चित्रपटाच्या विशेष शोच्या वेळी ऐश्वर्या तिची मुलगी आणि आई यांच्यासोबतच अधिक रमलेली दिसली. बच्चन आणि ऐश्वर्या यांच्यातील संबंध आता पूर्वीसारखे राहीलेले नाहीत या चर्चांना बळकटी देणारेच वातावरण त्यावेळी पाहायला मिळाले होते.