नवी दिल्ली: जम्मूमध्ये तावी नदीत अचानक पाणी वाढल्याने 4 लोक अडकले होते. ज्यांना वायू दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवले. यातील दोन लोक बांधकाम करण्यासाठी पुलाजवळील भिंतीवर सुमारे दोन तास अडकले होते.
#SavingLives : In a daring rescue operation, IAF Mi-17 helicopter rescued two civilians stranded in overflowing Tawi River near Jammu today.@SpokespersonMoD pic.twitter.com/GexaoXGOLP
— Indian Air Force (@IAF_MCC) August 19, 2019
बचावचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. बचावासाठी हेलिकॉप्टरमधून सोडलेला दोर तुटला होता आणि बचाव दलातील दोन जण वाहून गेले. मात्र, दोघांनाही सुखरुप वाचवण्यात आले. त्याचवेळी हेलिकॉप्टरने दुसरी दोरी सोडली आणि त्यानंतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात आले.
जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी तावी नदीवर चार लोक अडकल्याची माहिती भारतीय वायू दलाला दिली होती. हे चार लोक बांधकाम सुरू असलेल्या पुलावर अडकले होते. माहिती मिळाल्यावर वायुसेनेने तातडीने कारवाई केली आणि एमआय -१ हेलिकॉप्टर घटनास्थळी पाठविले.
#UPDATE Jammu & Kashmir: Two more persons have been rescued after they got stuck near a bridge in JAMMU following a sudden increase in the water level of Tawi river. pic.twitter.com/JI6oWRtR5B
— ANI (@ANI) August 19, 2019