नगर (प्रतिनिधी) – करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. करोनाबरोबरच इतरही वैद्यकीय सुविधांवर त्यांचा विपरित परिणाम झाला आहे. इतर रुग्णांना रक्ताचा भासत असलेला तुटवडा ही समस्या ओळखून रक्तदानाचा उपक्रम राबविला आहे. सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने नेहमीच सामाजिक भावनांचा विचार करुन विविध उपक्रम राबविले आहे. त्यांचे लोकाभिमुख उपक्रम नागरिकांना दिलासा देणारे ठरतात. त्यांच्या उपक्रमास नागरिकांचाही प्रतिसाद मिळत आहे, असे प्रतिपादन सुमित वर्मा यांनी केले.
सुमित वर्मा युवा मंचच्यावतीने आनंदऋषीजी ब्लड बॅंक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी गणेश ढोले, अभय कोटा, अनिकेत सियाळ, संकेत जरे, आकाश साळवे, योगेश गुंड, प्रकाश गायकवाड, राहुल वर्मा आदी उपस्थित होते. सुमित वर्मा म्हणाले, राज ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसेच्या माध्यमातून आपण कार्य करत आहोत. आपण पक्षीय राजकारण न करता समाजहित डोळ्यासमोर ठेवून काम करत असून आज रक्तदानचा उपक्रम राबविला. त्याला युवकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.