अहमदनगर ( जामखेड ) – रत्नदीप मेडिकल फौंडेशन चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या मनमानीला कंटाळून जामखेड येथे गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याच अनुषंगाने आज तिसर्या दिवशी गुरवार दि ७ मार्च रोजी सकाळी खर्डा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत मेडिकल कॉलेज मधिल विद्यार्थी व विविध संघटना व पक्षांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
गुरुवार दि ७ रोजी सकाळी खर्डा चौकात रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी, संघटना व काही पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चासाठी जमा झाले होते. सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी रत्नदीप चे अध्यक्ष डॉ भास्कर मोरे यांच्या विरोधात घोषणा दिल्या. मेडिकलच्या विद्यार्थींना न्याय मिळाला पाहिजे, भास्कर मोरे चे करायचे काय? खाली मुंडके वर पाय, भास्कर मोरेंना अटक झाली पाहिजे, रत्नदीप मेडिकल फौंडेशन चा भ्रष्टाचार थांबलाच पाहीजे, जामखेडची बदनामी थांबलीच पाहीजे अशा घोषणा मोर्चा निघाला त्यावेळी विद्यार्थींनी दिल्या.
सदरचा मोर्चा तहसील कार्यालयासमोर आल्या नंतर आण्णासाहेब सावंत यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करताना सांगितले की रत्नदीप मेडिकल ने जो काळा बाजार मांडला आहे त्याविरोधात सर्वांनी मिळुन आवाज उठवला पाहिजे, पोलीस प्रशासनाने हे मुलींचे प्रकरण अतिशय काळजीपूर्वक हाताळले पाहिजे, यावर एक कमीटी नेमावी व लवकरात लवकर हे प्रकरण हाताळावे. यानंतर सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी बोलताना सांगितले की जामखेड तालुका हा ऐतिहासिक तालुका आहे या ऐतिहासिक तालुक्यात आशा संस्थाचालका कडुन अशा घटना घटत घडत आहेत हे दुर्दैव आहे. तीन दिवस झाले तरी यावर प्रशासनाकडु तोडगा निघाला नाही त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी केली.
मनसे तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची आर्थिक मानसिक व शारिरीक पिळवणूक केली आहे त्याकडे राज्याचे मुख्यमंत्री व ग्रृहमंत्र्यांनी लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले म्हणाले की मेडिकल कॉलेज मध्ये स्टापच नाही तरी कॉलेज कसे चालते हे विशेष आहे याची चौकशी करावी तसेच प्रहार संघटना खंबीरपणे विद्यार्थींशी पाठीशी आहे.
या नंतर एका विद्यार्थ्याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की मुली केस द्यायला तयार आहेत तर जामखेड चे पोलीस हे केस घेण्यास टाळाटाळ करतात त्यामुळे यामध्ये काही आर्थिक तडजोड झाली आहे का असा सवाल करत आम्हाला न्याय मिळावा अन्यथा मी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा इशारा देखील दिला एका विद्यार्थ्याने दिला आहे. यानंतर रोहित चव्हाण यांनी सांगितले की ॲडमिशन घेतावेळी रेग्युलर फी सांगतात व एडमिनश घेतल्या नंतर ज्यादा फी वसुल करतात त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. गणेश हगवणे यांनी सांगितले की शिक्षणासाठी पाठवलेल्या विद्यार्थींच्या आई वडिलांना काय वाटत असेल या बाबत प्रशासनाने गांभीर्याने पाहिले व विद्यार्थीनी न्याय मिळण्यासाठी तातडीने मार्ग काढला पाहिजे.
मनसे नेते हवाशेठ सरनोबत म्हणाले की भास्कर मोरे यांनी तुमच्यावर दबाव आणला तर अर्ध्या रात्री आम्हाला मदत मागा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थींच्या खंबीर पाठीशी आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडुराजे भोसले म्हणाले की ज्या विद्यार्थ्यांनीवर अन्यथा होत आहे त्यांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून गावातील सुव्यवस्था बिघडली आहे याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली पाहिजे. बाहेरुन आलेल्या विद्यार्थ्यांच्या आम्ही खंबीरपणे पाठीशी आहोत.आ.रोहित पवार आ. प्रा. राम शिंदे व पालकमंत्री यांनी देखील याविषयाकडे गांभीर्याने पाहुन हा विषय हाताळला पाहिजे असे सांगितले.
मोर्चा दरम्यान तहसीलदार यांनी सांगितले की आपण दिलेल्या सर्व मुद्द्यांवर चर्चा होऊन आम्ही वरीष्ठ पातळीवर कळवले आहे. विनाकारण विद्यार्थींना घातलेल्या बंधनाबाबत डॉ मोरे यांना समज दिली आहे. तर इतर मागण्यांबाबत संबंधित कुलगुरूंना आपल्या मागण्यांचे निवेदन पाठवण्यात आले आहे.
यानंतर शेवटी मोर्चा दरम्यान तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे तालुका अध्यक्ष पांडुराजे भोसले, रमेश (दादा) आजबे, मनसेचे अध्यक्ष तालुका अध्यक्ष प्रदिप टापरे, हवा सरनौबत, सनी सदाफुले, आण्णासाहेब सावंत, पवनराजे राळेभात, प्रहारचे जयसिंग उगले, महेश निमोणकर, गणेश हगवणे, सचिन देशमुख, अवदुत पवार, नाना खंडागळे, आकाश घागरे, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेञे, गणेश मासाळ, गणेश जोशी, स्वप्निल खाडे विजय (टील्लु) राळेभात विकास मासाळ, बाळासाहेब ढाळे, रोहित चव्हाण, आम आदमी चे संतोष नवलाखा, अनिल पाटील यांच्या सह रत्नदीप मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.