कोपरगाव : समाजातील शेवटचा माणूस सुखी झाला पाहिजे, सर्वांचा विकास झाला पाहिजे, हे ध्येय बाळगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने अनेक लोककल्याणकारी योजना सुरू करून सर्वसामान्यांना बळ दिले आहे. विकासाच्या प्रवाहाबाहेर असणाऱ्या वंचित लोकांपर्यंत या शासकीय योजना पोहोचाव्यात, यासाठी ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ अत्यंत महत्त्वाची असून, आपण सर्वजण या यात्रेचे वारकरी म्हणून विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘विकसित भारत संकल्प यात्रा’ ही मोहीम देशभरात राबवली जात आहे. बुधवारी कोपरगाव शहरातील बाजारतळ भागात या यात्रेचे आगमन झाले असता स्नेहलता कोल्हे यांच्याहस्ते या यात्रेचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. नगर परिषदेच्या वतीने स्नेहलता कोल्हे यांच्याहस्ते केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात धनादेश वितरीत करण्यात आले यात्रेच्या माध्यमातून सर्व शासकीय यंत्रणांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांबाबत जनजागृती करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा. तसेच गरजू नागरिकांनी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.
याप्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी, गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे, भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, शिवसेना नेते कैलास जाधव, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक अतुल काले, जितेंद्र रणशूर, वैभव आढाव, गोपीनाथ गायकवाड, जयेश बडवे, विजय चव्हाणके, साईनाथ नरोडे, संतोष साबळे, रहीम शेख, तात्या राऊत, सुरेखा सूर्यवंशी, सरिता चोपडा, सतीश नरोडे, सचिन सावंत, जयप्रकाश आव्हाड, संतोष नेरे, गोरख देवडे आदींसह माजी नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध योजनांचे लाभार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. नगर परिषदेच्या वतीने नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली.