नवी दिल्ली – हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेल्या पाकिस्तानी सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व घ्यायचे आहे. याबाबत सीमाने राष्ट्रपती भवनाकडे याचिका पाठवली आहे. सीमाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील वकील एपी सिंग यांनी याचिका दाखल केली. सीमाने नागरिकत्व मिळवण्यासाठी पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीचा हवाला दिला आहे. याचिकेत म्हटले आहे की, सीमा हैदरचे ग्रेटर नोएडातील सचिन वर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासारख्या विदेशी नागरिक भारतात राहू शकतात मग मी का नाही, असा सवाल सीमा हैदर आणि तिच्या वकीलांना केला आहे.
सीमाने सांगितले की, प्रसिद्ध गायक अदनान सामीला भारतात दीर्घकाळ राहिल्यानंतर नागरिकत्व मिळाले. अशात मलाही नागरिकत्व मिळायला हवे. परवानगी मिळाल्यानंतर ती भारतात सन्मानाने राहू शकेल, असे सीमाने सांगितले.
6 वर्षात 4000 लोकांना मिळाले नागरिकत्व
याचिकेत सरकारी आकडेवारीचा हवाला देण्यात आला आहे. गेल्या सहा वर्षांत पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील ४ हजार नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आल्याचे सांगण्यात आले. सीमाच्या वतीने अधिवक्ता एपी सिंह यांनी याचिकेत सांगितले की, ती तपासात सर्व यंत्रणांना सहकार्य करत आहे. ‘पाकिस्तानी गुप्तहेर’च्या आरोपावरून सीमा लाय डिटेक्टर चाचणी घेण्यासही तयार आहे.
सीमाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना विनंती केली की, जर तिला भारतीय नागरिकत्व मिळाले तर ती पती, सासू आणि सासरे यांच्यासोबत राहू शकेल, अधिवक्ता एपी सिंह यांनी याचिकेत म्हटले आहे की, ही महिला फारशी शिक्षित नाही. सीमा हैदरने आपल्या चार मुलांसह पाकिस्तानातून दुबई आणि दुबईहून नेपाळमध्ये आल्याचा दावा केला आहे.नेपाळमध्ये सचिनशी लग्न केले आणि त्यानंतर भारतात आली. सीमा हैदर आता यूपी एटीएसच्या निशाण्यावर आहे. एटीएसने त्याची चौकशीही केली आहे.
पाकिस्तानी वंशाचा प्रसिद्ध गायक अदनान सामीला 2016 मध्ये भारतीय नागरिकत्व मिळाले. ते 13 मार्च 2001 रोजी भारतात आले. वेळोवेळी वाढवलेल्या व्हिजिटर व्हिसावर तो भारतात राहत होता. त्यानंतर त्यांनी दोनदा नागरिकत्वासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला होता. अदनान सामीने स्वतः याबाबत चर्चा केली होती आणि सांगितले होते की, 18 वर्षांच्या कालावधीत त्याला दोनदा नाकारण्यात आले. पाकिस्तानचे मूळ नागरिकत्व सोडल्यानंतर त्यांना दीड वर्षे राज्यहीन राहावे लागले, असे म्हटले जाते.