मुंबई – राज्यात सत्तांतराला वर्षपूर्ती झाली असून महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने करण्यात आला आहे. शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबई महापालिका प्रशासनाच्या कारभारातील भ्रष्टाचाराच्या विरोधात महापालिका मुख्यालयावर मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी मुंबईच्या लुटारूंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. चोर मचाये शोर हे मुख्यमंत्र्यांसाठी बोलताय कि आणखी कोणासाठी बोलताय ? असा सवाल यावेळी आदित्य ठाकरेंनी उपोस्थित केला. मुंबईच्या रस्त्यांमध्ये मोठा घोटाळा झाला तसाच खडीमध्ये देखील मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केला.
निवडणुका घेऊन दाखवा अस आव्हान देखील आदित्य ठाकरेंनी यावेळी सत्ताधाऱ्यांना दिल. खोके सरकार भ्र्ष्ट आहे. स्ट्रीट फर्निचरमध्ये देखील घोटाळा झाल्याचा आरोप यावेळी आदित्य ठाकरेंनी केला. यासह सिनिटरी पॅडमध्ये देखील घोटाळा झाल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. आमचे सरकार पुन्हा आल्यास या सर्व घोटाळेबाजांना जेलमध्ये टाकणार असल्याचा इशारा यावेळी त्यांनी दिला.
संजय राऊत यांचा देखील हल्लाबोल
सकाळपासून सगळ्यांना चिंता होती पावसामुळे या मोर्चाच काय होईल मात्र सूर्य उगवला आहे आणि याठिकाणी शिवसैनिकांचा पाऊस पडला आहे. असं संजय राऊत यावेळी म्हणाले. बजरंबली कर्नाटकात मोदींना पावला नाही पण इथं आदित्य ठाकरेंना पावला असा टोला देखील यावेळी राऊतांनी लगावला. ही मुंबई शिवसेनेची आहे आणि मुंबई महापालिका देखील शिवसेनेच्या बापाची आहे. बाळासाहेबांनी मुंबईच्या पालिकेवर भगवा फडकवला हा उतरवण्यासाठी दोन बोके आणि ४० खोके काम करत आहेत अशी टीका देखील यावेळी राऊत यांनी केली.
चोर मचाये शोर.. असं म्हणणाऱ्यांना राऊत म्हणाले आत्ता निवडणूक घ्या चोर कोण आणि शोर कोण हे दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल फक्त निवडणुका घ्या असं आव्हान यावेळी राऊत यांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला दिल.
आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात या मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी अंबादास दानवे,चंद्रकांत खैरे यासह संजय राऊत असे अनेक नेते उपस्थित होते. पाऊस सुरु असताना देखील ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले. चाळीस बोके ५० खोके मुंबईसाठी नॉट ओके अशा अनेक घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी दिल्या.