सातारा – जिल्ह्यात अद्यापही करोनाच कहर सुरु असून कराड तालुक्याने जिल्ह्याच्या चिंतेत भर घातली आहे. कराड तालुक्यात गेल्या 15 दिवसांत 21 हॉटस्पॉटमध्ये सुमारे दीड हजार बाधित आढळल्याने तालुका हॉटस्पॉट ठरु लागला आहे.
फलटण तालुक्यात काही अंशी बाधितांची संख्या घटत असली तरी सातारा आणि खटाव तालुक्यात धोका अद्याप कायम आहे. जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांत 79 हॉटस्पॉटमध्ये चार हजार 570 बाधित आढळले आहेत.
जिल्ह्यात पहिल्या लाटेत सातारा, जावळी, कराड, पाटण, खंडाळा या तालुक्यांत मोठ्या प्रमाणात बाधित आढळले होते. दुसऱ्या लाटेत बाधितांबरोबर मृत्यूचेही प्रमाण वाढल्याने जिल्ह्याची चिंता वाढली. सातारा, कराड, फलटण, खटाव, माण या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बाधित आढळून आले.
एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना दुसरीकडे मृत्यूची संख्याही वाढल्याने राज्यात हॉटस्पॉट म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण झाली. पॉझिटिव्हीटी रेट वाढल्याने जिल्हा रेडझोनमध्ये गेल्याने त्याचा आजही जिल्हावासियांना फटका बसत आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घातले असले तरी अद्याप तरी करोनाचा धोका कायम आहे.
या हॉटस्पॉटमध्ये खटाव तालुक्यात वडूज 130, बोंबाळे 37, खटाव 44, भुरकवडी 30, कटगुण 20, पुसेगाव 38, कलेढोण 24, पाचवड 43, मायणी 48, येळीव 60, पुसेसावळी 24, औंध 32,
अंबवडे 30, जावळी तालुक्यात सोनगाव 68, धोंडेवाडी 50, कुडाळ 61, आंबेघर 44, कोरेगाव तालुक्यात कोरेगाव 76, खेड 24, पिंपोडे बुद्रुक 21, साप 27, रहिमतपूर 101, अंभेरी 42. वाई तालुक्यात ओझर्डे 27, कवठे 32, शिरगाव 96.
माण तालुक्यात म्हसवड 35, दहिवडी 62, पळशी 60, टाकेवाडी 77. खंडाळा तालुक्यात लोणंद 147, शिरवळ 134, खंडाळा 40 बाधित आढळले आहेत. कराड तालुक्यात मलकापूर 184, काले 63, शेणोली 100, दुशेरे 36, कोडोली 21, कापील 80, गोंदी 34, कार्वे 152, सैदापूर 118, करवडी 35, बनवडी 66, शनिवार पेठ 75,
खराडे 23, किरपे 32, तारुख 89, पोतले 49, उंब्रज 66, रेठरे बुद्रुक 157, कालवडे 21, वारुंजी 43, पाली 49. पाटण तालुक्यातील तारळे 85, पाटण 18. फलटण तालुक्यात राजुरी 45,
हिंगणगाव 71, तरडगाव 51, निंबळक 46, राजाळे 23, साखरवाडी 38. महाबळेश्वर तालुका हारोशी 57 असे 15 दिवसात 79 हॉटस्पॉटमध्ये चार हजार 570 बाधित आढळले आहेत.
शेतकऱ्यांच्या कष्टाची किंमत पाच पेट्या?
सातारा, सांगली जिल्ह्यात शेळ्या चोरायच्या अन् चोरलेल्या शेळ्यांच्या मटणाला कोकणात जास्तीची मागणी असल्याने तिकडे विकायच्या असा धंदा या रॅकेटचा आहे.
गेली अनेक दिवस पोलिसांच्या हाती न लागणारे हे रॅकेट कसेबसे सातारा शहर पोलिसांच्या हाती लागल्याने शेळ्या चोरट्यांना जरब बसून बळीराजाला न्याय मिळेल अशी आशा सर्वांना होती.
मात्र, शेतकऱ्याच्या कष्टाची किंमत पाच पेट्या झाल्याने बळीराजाला न्याय मिळण्याऐवजी तो टोळीच्या सुत्रधाराला मिळाल्याची चर्चा आहे.