लोणावळा – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा बोरघाटात ऑटो रिक्षा आणि प्रवासी बस यांच्या दरम्यान भीषण अपघात झाला. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी पर्यटक जागीच ठार झाला. तर रिक्षा ड्रायवरसह अन्य दोन जण जखमी झाला असून यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सायमाळ याठिकाणी रविवारी (दि.6) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार कुमार गौरव गौतम (वय 26, मुळ रा.रीवा, मध्यप्रदेश) आणि शत्रुंजय त्रिपाठी (वय 27) असे मृत झालेल्या व्यक्तींची नाव आहे. रविवारी सकाळी 10.50 च्या दरम्यान रेल्वे मध्ये लोको पायलट म्हणून काम करणारे रेल्वे कर्मचारी कुमार गौरव गौतम, शत्रूंजय त्रिपाठी तसेच राघवेंद्र राठोड आणि सौरभ पाठक हे इतर दोन असे एकूण चार जण लोणावळा येथील वेट ऍन्ड जॉय या वॉटर पार्कममधून खोपोली रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी निघाले होते.
ते प्रवास करत असलेल्या रिक्षा (क्र. एमएच14 एचएम् 5296) चालकाचे सायमाळ जवळच्या वळणावरील तीव्र उतारावरर रिक्षावरल नियंत्रण सूटल्याने उलटी होऊन खोपोली कडून पुण्याकडे निघालेल्या प्रवासी बसच्या (क्र एमएच 04 जी 9925) ड्रायव्हर साईडला धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की रिक्षातील कुमार गौरव गौतम यांचा जागीच मृत्यू झाला. शत्रूंजय त्रिपाठी हे गंभीर तर राघवेंद्र राठोड, सौरभ पाठक रिक्षा चालक किरण वाघमारे हे किरकोळ जखमी झाले. यापैकी शत्रुंजय त्रिपाठी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.
Gujarat Assembly Election 2022 : केजरीवालांचा ‘तो’ दावा भाजपने फेटाळला
जखमी राघवेंद्र राठोड व सौरभ पाठक तसेच मृत कुमार गौरव गौतम व शत्रूंजय त्रिपाठी हे सर्व जण सहाय्यक लोको पायलट पदावर पश्चिम मध्य रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. रिक्षा चालक हा लोणावळा येथील रहिवासी असून त्याच्यावर खोपोली नगर पालिका रुग्णालयात उपचार घेत आहे. खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा भीषण अपघात झाला असून ह घटना समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर व त्यांचे कर्मचारी आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहचले . पुढील तपास पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश काळसेकर हे करत आहेत.