औरंगाबाद – कामाची टक्केवारी म्हणून साडेआठ लाख रुपयांची लाच घेताना औरंगाबाद जलसंधारण विभागातील एका अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिंबधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ऋषिकेश देशमुख असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील एसीबीची ही आतापर्यंती सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ऋषिकेश देशमुख हा जलसंधारण विभागात वैजापूर येथील उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. दरम्यान जलसंधारण विभागातील एका कामाची टक्केवारी म्हणून, त्यांने तक्रारदाकडे साडे आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिंबधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून एसीबीच्या पथकाने देशमुखला रंगेहात अटक केली.