नेवासा / राजेंद्र वाघमारे
नेवासा तालुक्यातील शेतकरी पारंपारिक पिकांना फाटा देऊन नवनवीन पिके घेत असून येथील शेती नव्या वळणावर आल्याचे यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना सांगितले. नेवासा तालुक्यातील रामडोह येथील प्रगतशिल शेतकरी भारत गुंजाळ यांनी गोदावरी काठावर सफरचंदाची फळबाग करून नवा प्रयोग यशस्वी केलेला आहे या सफरचंद फळबागेची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉ.अशोकराव ढगे व महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याचे मंडल कृषी अधिकारी मनोज सूर्यवंशी,कृषी अधिकारी लक्ष्मणराव सुडके,कृषी सहाय्यक संदीप गायकवाड यांनी केली.
याप्रसंगी शेतकरी अंबादास इरले,बाबासाहेब मारकळी नानासाहेब गोरे,रामदास काळे,सुनील भवर व पत्रकार राजेंद्र वाघमारे आदी उपस्थित होते यावेळी पुढे मार्गदर्शन करतांना डॉ. अशोकराव ढगे म्हणाले की, नवीन पिके घेऊन शेतकऱ्यांनी शाश्वत उत्पादनाचा विचार करावा विशेषतः सफरचंदासारख्या फळांना हमखास मार्केट असल्यामुळे या पिकाकडे युवक शेतकऱ्यांनी वळण्यास हरकत नाही तथा पिनवीन पीक घेताना शेतकऱ्यांनी त्याची सखोल व शास्त्रीय माहिती घेणे आवश्यक आहे पिकांची जात लागवडीचे तंत्रज्ञान एकात्मिक खतांचा वापर आणि कीड व रोगाचा बंदोबस्त या गोष्टी बरोबर जमिनीचे आरोग्य व पाणी व्यवस्थापन यासंबंधी कृषी शास्त्रज्ञा बरोबर चर्चा करावी आज महाराष्ट्रामध्ये पारंपारिक पिके न घेता अनेक शेतकरी नवीन पिके घेत आहेत मनमाड मध्ये जिरेनियम ची शेती तसेच दापोलीला कॉफी व बीड जिल्ह्यात सफरचंदाची शेती यशस्वी होत असून शेतकऱ्यांना दोन पैसे मिळत आहेत नवीन पिकाबद्दल आधुनिक तंत्रज्ञान याची चर्चा झाली पाहिजे म्हणजे शेतकरी नव्या वाटा शोधतील.
भारत गुंजाळ यांनी रामडोह येथील शेतावर सफरचंदाची लागवड करताना दोन ओळीतील अंतर १५ फूट व दोन रोपातील अंतर दहा फूट ठेवले आहे हरीमन ९९ या सफरचंदाच्या जातीची रोपे हिमाचल प्रदेशातून आणली आहेत पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक संच बसविण्यात आले आहेत त्यांची जमीन मध्यम भारी काळी आहे तथापि त्यांच्यामध्ये सफरचंद मध्यम हलक्या जमिनीवर सुद्धा चांगली येऊ शकेल हवामानाच्या बाबतीत चर्चा करताना डॉक्टर ढगे म्हणाले की हिमाचल प्रदेशात ज्या ठिकाणी सफरचंद घेतले जातात तेथील हवामान जास्त विषम आहे त्यापेक्षा नेवासा तालुक्यातील विषम हवामान कमी आहे सफरचंदाला बाजारामध्ये चांगली मागणी असूनपेशंट साठी ग्राहक सफरचंदाला पसंती देतात त्यामुळे मार्केटची चांगली हमी आहे त्याचबरोबर भाव रास्त मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांनी सफरचंदाची लागवड करताना कृषी विद्यापीठाचा सल्ला घ्यावा कृषी शास्त्रज्ञ डॉढगे यांनी शेतकरी भारत गुंजाळ यांचे कौतुक