पुणे : शहर आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसापासून होणाऱ्या सततच्या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली असून बहुताश धरणे पूर्ण भरली आहेत. त्यामुळे धरणातून सतत पाण्याचा विसर्ग होत आहे. परिणामी शहरातील मुळा-मुठा नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
त्यामुळे शहरातील बहुताश पूलाला पूराच्या पाण्याने स्पर्श केला आहे. येरवड्यातील नागरिकांनी देखील येरवडा पूलावर पूराच्या पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, त्यामुळे पूलाला जत्रेचे स्वरूप आले आहे. तसेच काही नागरिक पूलावरच गाड्या लावून पूर पाहत असल्याने परिणामी पूलावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे.