नवी दिल्ली – पुलवामा हल्ला प्रकरणात आता कॉंग्रेसने माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावर कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी जोरदार आक्षेप घेताना भाजपलाच काही सवाल केले आहेत.
आम्ही माफी नेमकी कशासाठी मागायची? असा सवाल करून त्यांनी म्हटले आहे की, जवानांना सुरक्षित ठेवण्यात सरकारला अपयश आल्याची टीका आम्ही केली होती त्याबद्दल आम्ही माफी मागायची?, या जवानांच्या मृत्यू प्रकरणाचे राजकारण करण्याऐवजी आम्ही राष्ट्रध्वजाचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही माफी मागायची? की शहीद जवानांच्या कुटुंबीयांविषयी सहानुभूती व्यक्त करून त्यांचे सांत्वन केले होते त्याबद्दल आम्ही माफी मागायची काय? असे प्रश्न त्यांनी भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना ट्विटरवरून विचारले आहेत.
जावडेकर यांनीच काल कॉंग्रेसने पुलवामा प्रकरणात माफी मागावी, अशी मागणी केली होती.