नवी दिल्ली: कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे देशात ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘अनलॉक ३’ मधील नवे नियम जाहीर करण्यात आले आहेत. देशभर सुरू असणअरी रात्रीची संचारबंदी अनलॉक ३ मध्ये उठवण्यात आली. त्याचबरोबर जीम आणि योगा संस्था पाच ऑगस्टपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
प्रमुख तरतुदी
- रात्रीची संचारबंदी रद्द
- योगा संस्था आणि जीम आदर्श आचार संहिता पाळून सुरू करण्यास मान्यता.
- सामाजिक अंतर पाळून स्वातंत्र्य दिन कार्यक्रमास मान्यता.
- शाळा, महाविद्यालये ३१ ऑगस्टपर्यंत बंद.
- वंदे भारत मोहीमेपुरतीच आंतरराष्ट्रीय उड्डाणांना परवानगी.
- प्रतिबंधित क्षेत्राबाहेर खालील वगळता सर्व उद्योगांना परवानगी
वगळलेले उद्योग
मेट्रो रेल्वे, सीनेमा हॉल, स्वीमींग पूल, मनोरंजन उद्याने, थिएटर, बार, प्रेक्षागृहे, सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक , सांस्कृतिक, धार्मिक मेळावे
Ministry of Home Affairs (MHA) issues #Unlock3 guidelines. Restrictions on the movement of individuals during night have been removed. Yoga institutes and gymnasiums will be allowed to open from August 5, 2020. pic.twitter.com/eTTJwWei0K
— ANI (@ANI) July 29, 2020