नवी दिल्ली – चाचणी, पाठपुरावा, उपचार या धोरणानुसार भारताने सलग दोन दिवस प्रतिदिन पाच लाखांहून अधिक कोविड- 19 नमुन्यांची चाचणी करण्याचा नवीन उच्चांक कायम ठेवला आहे. 26 जुलै रोजी, भारतात एकूण 5 लाख 15 हजार नमुने तपासले गेले आणि 27 जुलै रोजी एकूण 5 लाख 28 हजार नमुने तपासण्यात आले.
वर्गीकृत आणि सतत वाढणाऱ्या प्रतिसादामुळे देशातील चाचणीचे जाळे सातत्याने वाढविण्यात आले असून आजवर केलेल्या प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण 12 हजार 562 वर पोहोचले आहे. आज पर्यंत 1.73 कोटी चाचण्यांचा आकडा ओलांडला गेला आहे.
पंतप्रधानांच्या हस्ते काल व्हर्च्युअल पद्धतीने उद्घाटन झालेल्या नोएडा, मुंबई आणि कोलकाता येथे तीन उच्चप्रतीच्या चाचणी सुविधांचा समावेश करून भारताच्या चाचणी क्षमतेस आणखी गती मिळाली आहे.
देशातील 1310 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे. सध्या 905 सरकारी प्रयोगशाळा आणि 405 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.