बॉलीवूडमध्ये सध्या नेपोटिझवरून बराच वादंग सुरू आहे. दररोज चित्रपटसृष्टीतील काही संबंधित लोक एकमेकांवर आरोप करीत आहेत. यामुळे काही सेलिब्रिटींमध्ये ट्विटर वॉर चालू आहे.
आता अभिनेता रणवीर शौरी आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या बाबतीतही असेच घडले आहे.अभिनेता रणवीर शौरीने एक ट्विट करत बॉलीवूडच्या या समुहाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. रणवीरने ट्विटमध्ये लिहिले की, या इंडस्ट्रीमध्ये असे अनेक योद्धा आहेत जे आता बॉलीवूडमधील मेनस्ट्रीमची चापलूसी करत आहेत. हे तेच लोक होते जे यापूर्वी या सिस्टमविरोधात सातत्याने बोलत होते. परंतु बॉलीवूडमध्ये एन्ट्री मिळताच ते गप्प झाले. ही तर हिपोक्रेसी आहे.
रणवीरने आपल्या ट्विटमध्ये कोणतेही नाव घेतलेले नाही, परंतु दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी हे ट्विट स्वत:वर लक्ष्य केल्याचे वाटले. कश्यपने कमेंट करत ट्विट केले की, रणवीर तुला हे खरच असे वाटते का? तूला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट सांग. कोण कोणाची चापलूस करीत आहे.
यावर रणवीरने कोणावरी चिखलफेक करण्याचा उद्देश नसल्याचे स्पष्ट केले. पण हा वाद तिथेच संपला नाही. अनुरागने बऱ्याच ट्वीटमध्ये दावा करत लिहिले की, त्याने सर्वाधिक बाहेरच्या लोकांना संधी दिल्या आहेत. त्याचवेळी त्याने रणवीरवर लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला. सध्या ट्विटरचे हे वॉर सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.