नगर – करोनाच्या संकट काळात महाविकास आघाडीने नागरिकांना धीर देण्याचे काम केले आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्यबरोबर विविध योजना सक्षमपणे राबविण्याचे काम करत आहे. काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना 2 हजार व 3 हजार रुपयांची मानधनात वाढ करण्यात आली, अशी माहिती महिला शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षा रेश्मा आठरे यांनी दिली.
राज्य सरकारने आशा वर्कर व गट प्रवर्तक यांना अनुक्रम 2 हजार व 3 हजार रुपयांची मानधनात वाढ केल्याबद्दल सावित्री फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुनंदा कांबळे, गटप्रवर्तक शुभांगी दळवी-घाडगे, आशा वर्कर सारिका डेंगळे आदी उपस्थित होते.
यावेळी आठरे म्हणाल्या की, आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी शासनाच्या विविध योजना गावपातळीवर यशस्वीपणे राबवित असतात. त्यांच्या कामाची दखल राज्य सरकारच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आ. संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून घेण्यात आला आहे.