नवी दिल्ली – पाकिस्तानमधील भारतीय दूतावासात कार्यरत असलेले दोन अधिकारी बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पाकिस्तानाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
सूत्रानुसार, इस्लामाबादमध्ये भारतीय दूतावासाचे कार्यालय असून, सोमवारी दोन्ही अधिकारी बेपत्ता झाले आहेत. अधिकारी बेपत्ता होऊन दोन तास लोटले आहेत. याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने पाकिस्तानाकडे हा मुद्दा उपस्थित केला आहे.
Ministry of External Affairs (MEA) has taken up the matter of untraceable Indian officials (working with Indian High Commission in Islamabad) with Pakistan: Sources pic.twitter.com/gIkbWMGI12
— ANI (@ANI) June 15, 2020
दरम्यान, ३१ मे रोजी पाकिस्तानाच्या भारतातील उच्चायुक्त कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांनी हेरगीरीचे कृत्य केल्याने भारत सरकारने त्यांना 24 तासात देश सोडून जाण्याचा आदेश दिले होते. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) च्या माध्यमातून इस्लामाबादमध्ये तैनात शीर्ष भारतीय मुत्सद्दी गौरव अहलुवालिया यांना त्रास देण्याचे प्रकरण समोर आले होते. अहलुवालिया यांचा दुचाकीवरून पाठलागही करण्यात आला होता.