नवी दिल्ली – देशांतर्गत विमान वाहतूक दोन महिन्यांच्या खंडानंतर सुरू झाली. त्यामुळे भारतीय आकाशात ऍक्शन परतल्याची प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी दिली. कालपर्यंत विमानांचे एकही देशांतर्गत उड्डाण झाले नाही. मात्र, आज 532 विमानांनी उड्डाणे घेतली. त्यातून 39 हजार 231 जणांनी प्रवास केला.
आता उद्यापासून आंध्रप्रदेशची आणि 28 मेपासून पश्चिम बंगालची विमान वाहतूक सुरू होईल. त्यामुळे उड्डाणांची संख्या आणखी वाढेल, असे पुरी यांनी म्हटले. दरम्यान, काही राज्यांनी विमानतळे खुली करण्यास अनुत्सुकता दर्शवल्याने सुमारे 630 विमान उड्डाणे रद्द करावी लागली.