बारामती : कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील आणखी दोन जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे .त्यामुळे बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या आता सहावर पोहोचली आहे . कोरोनाचा वाढता आलेख बारामतीकरांसाठी धोकादायक ठरत असून बारामती शहरावर कोरोनाचे काळे ढग अधिक गडद झाले आहेत. कोरोनाचे 6 रुग्ण आढळल्यानंतर बारामती कोरोनाचे वाढते संकट पाहता बारामतीकरांनी खबरदारी घ्यावी घरातून बाहेर पडू नये . घाबरून जाऊ नये मात्र काळजी घ्यावी तसेच प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.
शहरातील श्रीराम नगर तसेच समर्थ नगर येथील परिसरातील तीन किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही कारणास्तव नागरिकांना घराच्या बाहेर पडता येणार नाही. समर्थ नगर येथील एकाच कुटुंबातील पाच व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये दोन लहान मुलींचा देखील समावेश आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचा सर्वे सुरू आहे . लहान मुलांच्या संपर्कात इतर काही लहान मुले आले आहेत का ? याचा देखील शोध घेतला जात आहे. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली जात असून शहरातील पोलिसबं दोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरात विनाकारण फिरणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी सांगितले.
लॉक डाउन असतानादेखील विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वर कारवाईचे सत्र सुरूच आहे . एमआयडीसी येथील पेन्सिल चौकात नाकाबंदी करून विनाकारण फिरणाऱ्या 22 जनावर कलम (188) प्रमाणे आज गुन्हे दाखल करण्यात आले आहेत . 19 दुचाकी जप्त करण्यात आले असल्याचे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी सांगितले.
शहरात कोरोनचा दुसरा रुग्ण सापडल्यानंतर योग्य ती दक्षता घेतली जात असून प्रशासनाने आता भाजीपाला, फळे, चिकन, मटण, मासळी यांची दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेले दोन दिवसा पासून दुकाने बंद आहेत. सध्यातरी जीवनावश्यक सुविधा सुरू आहेत. मात्र कोरूना चे वाढते संकट पाहता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानावर देखील वेळेची मर्यादा येऊ शकते, असं मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी सांगितले.