“मन की बात’मधून पंतप्रधानांनी दिली माहिती
नवी दिल्ली – भारतात फार पूर्वीपासून 500 प्रकारचे हजारो पक्षी विविध हंगामात स्थलांतर होऊन येत असतात कारण भारताचे भौगोलिक वातावरण, जैवविविधता आणि निसर्गाने भारताला दिलेले अनौखिक वन वरदान. यामुळे हिवाळा ते ग्रीष्मापर्यन्त अनेक पक्षांच्या आगमनाने पक्षी पर्यटनाचा आस्वाद आपल्याला घेता येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज “मन की बात’मध्ये सांगितले.
आकाशवाणीवरून दर महिन्याला प्रसारीत होणाऱ्या या कार्यक्रमातून त्यांनी तरुण मुलांचा नवनिर्मितीकडे असलेला कल लक्षात घेऊन, भारत अशा विद्यार्थ्यांसाठी करत असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती सांगितली. मुलांना सॅटेलाईट थेट लॉचिंग अभ्यागत कक्षातून जिथे 10 हजार लोकांची बसण्याची व्यवस्था आहे तेथून थेट बघता येईल. त्यांनी सर्व शाळांच्या मुख्याध्यापक आणि पालकांना विनंती केली कि याचा लाभ घ्यावा. त्यानी ‘युविका’ म्हणजे युवक विज्ञान कार्यक्रमाविषयी माहिती सांगितली. पंतप्रधान म्हणाले कि, हा कार्यक्रम म्हणजे आमचं “व्हिजन’ आहे. “जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय संशोधन’ याला अनुरूप या कार्यक्रमाची रूपरेखा तयार केली आहे. इस्रोच्या वेगवेगळ्या केंद्रांमध्ये जाऊन अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि त्याचा प्रत्यक्षात केला जाणारा वापर, यांच्याविषयी शिक्षण, माहिती घेता येणार आहे, असेही सांगितले.
लेह इथल्या कुशोक बाकुला रिम्पोची या विमानतळावरून भारतीय वायुसेनेच्या एएन 32 विमानाने ज्यावेळी हवेत उड्डाण केले, त्यावेळी इतिहासाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. यामध्ये बायो-जेट इंधनाचे मिश्रण पहिल्यांदाच वापरण्यात आले होते. बायो-जेट इंधन हे झाडांच्या अखाद्य तेलापासून बनवण्यात आले असून भारतातल्या वेगवेगळ्या आदिवासी भागातून हे विशिष्ट इंधन खरेदी केले आहे. या नवीन प्रयोगामुळे केवळ कार्बन उत्सर्जन कमी होऊन कच्चे तेल आयात करण्यासाठी भारताला इतर देशांवरचे परावलंबित्व कमी होईल. डेहराडूनच्या भारतीय पेट्रोलियम संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांनी हे जैवइंधन वापरून विमान उडवण्याचे तंत्रज्ञान यशस्वी करून दाखवले यासाठी पंतप्रधांनांनी त्यांचे खास अभिनंदन केले.
ग्रामीण युवकांचे साहस, त्यांची जिद्द देशाच्या नव्या यशोगाथा लिहिण्यात योगदान देत असल्याचे आणि असे क्रीडापटू जे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, स्वतःचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहीत असल्याचे सांगितले. त्यांनी देशवासियांना येणाऱ्या गुडीपाडवा, होळी, रंगोत्सव जे नकळत समाजाला एकात्मतेचा संदेश देतात त्यासाठी शुभेच्छा दिल्यात.