पुणे : महाराष्ट्राने रणजी करंडक स्पर्धेत झारखंडविरूध्द पहिल्या डावात सर्वबाद ४३४ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात तिस-या दिवशी झारखंडाचा पहिला डाव १७० धावांवर आटोपला. त्यानंतर फाॅलोनची नामुष्की ओढवल्यानंतर दुस-या डावात फलंदाजी करताना झारखंडची तिस-या दिवसअखेर १ बाद ४७ अशी बिकट अवस्था झाली आहे.
Stumps Day 3: Jharkhand – 47/1 in 15.6 overs (Utkarsh Singh 12 off 36, Md Nazim 23 off 34) #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2020
महाराष्ट्राच्या ४३४ धावांचा पाठलाग करताना झारखंडचा पहिला डाव १७० वर आटोपला. झारखंडकडून फलंदाजीत पहिल्या डावात सौरभ तिवारीने सर्वाधिक ६२, विराट सिंगने ४३ आणि अजय यादवने २९ धावा केल्या. याशिवाय एकही फलदाज मैदानावर तग धरू शकला नाही. महाराष्ट्राकडून गोलंदाजीत पहिल्या डावात सत्यजित बच्छावने सर्वाधिक ५-५५ तर चौधरीने ३-२१ आणि काझीने २-२३ गडी बाद केले.
End Innings: Jharkhand – 170/10 in 72.6 overs (Ajay Yadav 29 off 15, Rahul Shukla 2 off 6) #MAHvJHA @paytm #RanjiTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2020
त्यानंतर फॉलोऑनची नामुष्की ओढवल्यानंतर दुस-या डावात झारखंडने तिस-या दिवसअखेर १ बाद ४७ धावा केल्या आहेत. सत्यजित बच्छावने कुमार देवोब्रतला १० धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. तिस-या दिवसांचा खेळ थांबला तेव्हा एमडी नाझिम २३ आणि उत्कर्ष सिंग १२ धावांवर खेळत होता.