कोलकाता : सुधारीत नागरीकत्व कायदा (का) आणि राष्ट्रीय नागरीकत्व सुची (एनआरसी) विरोधात 13 ते 15 डिसेंबर दरम्यान झालेल्या हिंसाचारात रेल्वेचे मोठे नुकसान झाल्याचा दावा कलकत्ता उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात करण्यात आला आहे.
पूर्व रेल्वेने मुख्य न्यायाधिश टीबीएन राधाकृष्णन् आणि न्या. ए. बॅनर्जी यांच्या खंडपीठापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत कोट्यवधी रूपयांची मालमत्ता नष्ट झाली. सर्वाधिक नुकसान सीलदाह जिल्ह्यात झाले असून तेथे 46 कोटी रुपयांच्या मालमत्तेची हानी झाली.
पुर्व रेल्वेच्या माल्दा विभागात सुारे एक कोटीचे नुकसान झाले. तर हावडा विभागात कोटी पेक्षा अधिक रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. या शिवाय रेल्वे, स्थानक आणि मार्गांच्या मालमत्तेचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत येत्या चार आठवड्यात सुनावणी होणार आहे.