तांबेवाडीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान, उसाच्या शेतात गुडघ्याएवढे पाणी साचले
अणे – तांबेवाडी (ता.जुन्नर) परतीच्या पावसाने सध्या उघड दिली असली तरी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांच्या शेतात साचलेल पाणी काही कमी होताना दिसत नाही. तांबेवाडी येथील दस्तगीर पठाण या शेतकऱ्याच्या सोयाबीन, ऊस, कांदा, डाळिंब या पिकातील पाण्याचा आद्यपही निचरा झालेला नाही. सोयाबीनचे सर्व पीक पाण्याखाली असून एकूण पाच लाख रुपयांचा या पावसाने पठाण यांचे नुकसान झाले आहे. डाळिंबाचे पीक पिवळे पडले असून फुले जळून गेली आहेत. उसाच्या शेतात गुडघ्याएवढे पाणी साचले आहे.
शेतात पाणी साचूनसाचून शेतातील पाण्यावर शेवाळ साचले आहे. शेजारच्या शेतातील सर्व विहिरी उपळळ्याने शेतात वारंवार पाणी येत आहे. जरी पिकाचे पंचनामे झाले असले तरी सरकार या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पदरी काय टाकतय याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष लागले आहे.
जवळपास सर्वच विहिरी उपळळ्याने शेतात वारंवार येतेय पाणी
माझ्या हातातोंडाशी आलेला घास गेला आहे. जास्तीत-जास्त नुकसानभरपाई मिळावी. खत, बी-बियाणे, मजुरी, औषध, वीज बील, फवारणी यावर माझा लाखो रुपये खर्च झाला आहे. शेतातील पावसाचे पाणी अजून कमी झाले नाही त्यामुळे पुढील दोन महिने तरी शेतात कोणतही पीक घेता येणार नाही. आहे ती पीक ही गेले व पुढे दोन महिने शेत अंगावर पडले आहे.
-दस्तगीर पठाण, नुकसानग्रस्त शेतकरी, तांबेबाडी