अरविंद सावंत मंत्रिपदाचा राजीनामा देणार
मुंबई : राज्यातील सत्तास्थापणेचा संघर्ष शेवटच्या टोकला गेला आहे. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्तास्थापण करण्यासाठी निमंत्रण दिल्यानंतर आता राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत. कारण सत्तास्थापण करण्यासाठी शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे आता निश्चीत झाले आहे. याविषयीचे ट्विट केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत यांनी केले आहे. लोकसभेपूर्वी ठरलेल्या फॉर्म्युलानुसार मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप व्हावं, या मागणीवर ठाम राहिलेल्या शिवसेनेनं अखेर एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. याचे पहिल पाऊल म्हणजे मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. सावंत यांनी ट्विट करून आपण राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभीमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे.. 1/2
— Arvind Sawant (@AGSawant) November 11, 2019
लोकसभा निवडणुकीआधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना (भाजपा आणि शिवसेना) तो मान्य होता. आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? आणि म्हणूनच मी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. या संदर्भात आज सकाळी 11 वाजता दिल्ली येथे मी पत्रकार परिषद घेणार आहे,असं सावंत यांनी ट्विट करून सांगितल आहे.
रविवारी सत्ता स्थापन करण्यास भाजपाने नकार दिल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला रविवारी आमंत्रण दिले. सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडे आजचा दिवस असून, शिवसेना बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी काय तडजोडी करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यासाठी शिवसेनेला राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची मदत घ्यावीच लागणार आहे. शिवसेनेला पाठिंबा द्यायचा की नाही यावरून कॉंग्रेसमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. तर शिवसेनेला एनडीएतून बाहेर पडण्याविषयी भूमिका घ्यावी लागेल, तरच आम्ही पाठिंबा देण्यासंदर्भात निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीने म्हटले होत. त्यानंतर शिवसेनेने भाजपाला दूर करत एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.