नवी दिल्ली – चिनी बनावटीचे फटाके स्वस्त असल्याने भारतात चिनी बनावटीच्या फटाक्यांना अधिक मागणी असते. केंद्र सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. समुद्रमार्गे बेकायदेशीररीत्या आयात होणाऱ्या या फटाक्यांमुळे फटाका उद्योग धोक्यात आला आहे. परदेशातून आयात केलेल्या फटाक्यांची किरकोळ बाजारात विक्री करणे बेकायदेशीर आहे. कायद्याचे उल्लंघन करून बाजारात फटाके विकताना कोणी आढळल्यास त्याविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याने चीनचा फटाके उद्योग संकटात आला आहे.
भारतीय बनावटीचे फटाके गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने चिनी फटाक्यांपेक्षा निश्चित चांगले आहेत. तर चिनी फटाक्यांमध्ये क्लोरेट आणि पर-क्लोरेटचा या विषारी केमिकलचा वापर करण्यात येतो. एकूणच चिनी फटाके बनवताना हलक्या प्रतीचा व हानिकारक कच्चा माल वापरला जात असल्याने ते आपल्या फटाक्यांच्या तुलनेत स्वस्त असतात. मात्र, चिनी फटाके जास्तकाळ टिकत नाहीत. त्या तुलनेत भारतीय फटाके वर्षभर टिकतात. मात्र फटाका उद्यागाने आधुनिक बनण्याची गरज व्यक्त केली जात असून त्यामुळे भारतीय फटाके जागतिक उत्पादनांशी स्पर्धा करू शकतील. आपण चिनी फटाके आपण टाळावेत कारण आपल्या फटाका उद्योगाचे हजारो कोटींचे नुकसान होते.
तस्करी रोखण्यात अपयश
परदेशातून येणाऱ्या कंटेनरची चौकशी करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कस्टम विभागाचे रडगाणे असते. बंदरावर येणाऱ्या कंटेनरची तपासणी केली जाते. मागे शिवाकाशीमध्ये चिनी फटाके जप्त करण्यात आले होते. हे फटाके तुतिकोरीनमधून मुंबईत नेले जात होते. दोन वर्षांपूर्वी नेपाळमधून देशात आलेले कंटेनर पकडण्यात आले होते. बहुतेक माल नेपाळमार्गे किंवा समुद्रमार्गे भारतात येतो, असेही दिसून आले आहे.
सध्या देशातले इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मार्केट चीनने पूर्णपणे कॅप्चर केले आहे. मोठ्या शहरांपासून छोट्या गावापर्यंत चीनच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या वस्तू आपल्या देशात तयार झालेल्या तशाच वस्तूच्या तुलनेत स्वस्त मिळतात, अनेकदा यात नावीन्य देखील असल्याचे दिसते. भारतातील ग्राहकाची मानसिकता आपल्यापेक्षा चीननेच चांगली ओळखलेली दिसतेय्. च्या निवडणुकीत अनेक ठिकाणी चिनी बनावटीच्या प्रचारसाहित्याला पसंती दिली होती. मात्र, आता फटाक्यांसह ही बाजारपेठही संकटात येण्याची चिन्हे आहेत.
अशातच भारतात स्वदेशी वस्तू खरेदी करण्याला सरकार प्रोत्साहन देत असल्याने परदेशी, विशेषत: चिनी बनावटीच्या वस्तूंवर लोक स्वखुशीने बहिष्कार टाकताना दिसत आहेत.