जवळार्जून – परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. त्याबरोबर नाझरे, सुपे, जवळार्जून या गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. या पुलावरून पावसाचे पाणी साधारणत: चार ते पाच फूट उंचीवरून गेल्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूचे कठडे तुटले आहेत. पावसामुळे कडब्याच्या गंजी वाहून गेल्या आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांची बाजरी कणसे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत.