राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न
श्रीनगर : कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील वातावरण तणावपुर्ण असल्याचे दिसत आहे. अनेक भागांमध्ये निर्बंध लागू करण्यात येत आहेत. त्यातच आता सरकारकडून राज्यतील परिस्थिती पुर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. काश्मीरातील शासकीय कार्यालये, शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. आता जम्मूतील पाच जिल्ह्यांमध्ये मोबाईल सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
Mobile phone services snapped across #JammuAndKashmir since August 5, resumed in five districts of Jammu region- DODA, KISHTWAR, RAMBAN, RAJOURI and POONCH pic.twitter.com/DO6BK3halF
— ANI (@ANI) August 29, 2019
सध्या काश्मीरमध्ये प्रत्येक ठिकाणचा अंदाज लक्षात घेवून लादण्यात आलेली निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. केंद्र सरकारने काश्मीर खोऱ्यात संचारबंदीसह दूरसंचार, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. याचा परिणाम स्थानिकांच्या जीवनावर झाला आहे. दूरसंचार सेवा बंद असल्याने नागरिकांना प्रशासनाने सुरू केलेल्या फोन सेवेसाठी रांगेत उभे राहावे लागत आहे. काश्मीर खोऱ्यातील हे निर्बंध उठवण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिकाही सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, परिस्थितीचा आढावा घेऊन ही बंधने हटवण्यात येतील, अशी भूमिका प्रशासनाने न्यायालयात मांडली होती. न्यायालयानेही प्रशासनाला वेळ देण्याची गरज असल्याचे म्हटले होते.