कोल्हापूर : कोल्हापुर, सातारा आणि सांगलीत पूराने मागील काही दिवसांपासून तांडव केला होता. तर आता या भागात पावसाचा जोर कमी झाला आहे आणि पुराचे पाणी हळुहळु कमी होताना दिसत आहे. त्यातच आता आज सकाळपासून पुणे-बंगळुर महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे महामार्गावरील अवजड वाहतूक सुरू करण्यात आली आहे. महामार्गावर अजूनही दीड फूट पाणी आहे. त्यामुळे लहान प्रवासी गाड्या सुरू करण्यात आल्या नव्हत्या मात्र आता दुपारी बारा वाजता सर्व प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.
Maharashtra:Aircraft assets of South Western Air Command continued High Availability Disaster Recovery missions in Kolhapur today by positioning 1700 kgs of specialist life-saving drugs&medicines along with 22 personnel from Army Medical Corps from Pune airbase by 2 Avro aircraft pic.twitter.com/f8OykKm6uC
— ANI (@ANI) August 11, 2019
एकाच मार्गावरून कोल्हापूर आणि पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक सुरू झाली आहे. फक्त दुचाकी वाहतूक बंद आहे. तब्बल सात दिवसानंतर महामार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे. पाण्याचे टॅंकर रुग्णवाहिका, पेट्रोल-डिझेल, गॅसचे टॅंकर, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी वाहने प्राधान्यांने कोल्हापूर शहरात येत आहेत. बेळगावपर्यंत वाहतूक सुरू असून गरज असेल तरच बाहेर पडा. यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही असे कोल्हापूर पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी म्हटलं आहे.