वाल्हे – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीने आज जेजुरीतील मुक्काम हलवत पालखीच्या पुढील मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजेच वाल्ह्यामध्ये पोहोचली आहे. वाल्ह्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी पंचकृषीतील समस्त भक्तजनांनी गर्दी केली असून पालखी दर्शनासाठी मोठी रांग लागली आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तजनांच्या कपाळी वैष्णवांचा टिक्का लावणारे अनेक छोटे व्यावसायिक पालखीसोबत चालत असतात. भक्तांच्या कपाळावर गंध लावायचा, भक्ताने स्वखुशीने काही दिले तर घ्यायचे अन्यथा विठ्ठलाची सेवा समजून पुढे चालत राहायचं असं या व्यावसायिकांच्या कामाचं स्वरूप असतं. अशाच काही व्यावसायिकांशी दैनिक प्रभातने साधलेला संवाद.