मुंबई – प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करायला मी तयार आहे, असं म्हणल्यानंतरही ते तयार नसतील तर मग त्यांनी माझ्या नेतृत्वाखाली काम करावं, असा टोला केंद्रिय न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना लगावला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी केली. माझा पक्षाच्या नावातच ‘रिपब्लिकन ए’ आहे. आम्ही ‘बी’ वगैरे काही नाही. आम्ही लपून छपून राजकारण करत नाहीत, अशा शब्दात त्यांनी आंबेडकरांना लक्ष्य केलं. समाजाच्या लोकांची जर आम्ही एकत्र रहावं अशी जर इच्छा असेल तर मी तयार असेल, असंही ते म्हणाले.