देशात अनेक ठिकाणी असणारे पुस्तकी अभ्यासक्रम वेगवेगळे असतात. परंतु, सरकारने समितीची शिफारसी मंजूर केल्यानंतर संपूर्ण देशात आठवीपर्यंत हिंदी हा विषयही अनिवार्य होणार आहे. सध्या बिगर हिंदी राज्यांमध्ये म्हणजेच तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, गोवा, पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये हिंदी अनिवार्य नाही. मात्र तामिळनाडूतील शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे. आता जरी हिंदी भाषेच्या सक्तीला तामिळनाडूतून झालेल्या प्रखर विरोधामुळे अखेर केंद्र सरकारने माघार घेतली असली तरी सोशल माध्यमांमध्ये हा अजूनही चर्चेचा मुद्दा आहे.
There is a big difference between a native #Tamil speaker learning #Hindi vs being forced to study it and write exams in it. I speak 5 languages and understand 10. I wasn’t forced to learn them and that’s how it should be. #India is a mixture of great languages. Leave them be.
— Siddharth (@Actor_Siddharth) June 4, 2019
बऱ्याच दाक्षिणात्य सेलिब्रिटींचाही हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध आहे. ‘रंग दे बसंती’ फेम अभिनेता सिद्धार्थ यानेही सोशल मीडियावर एका नेटकऱ्याला उत्तर देत हिंदी भाषेच्या सक्तीवरून टोला लगावला आहे. सिद्धार्थने ट्विट केलं आहे की, ‘ एका तमिळ स्थानिकाने हिंदी शिकणं आणि सक्तीने हिंदी भाषा शिकून त्यात परीक्षा द्यायला लावणं यात खूप मोठा फरक आहे. मी स्वत: पाच वेगवेगळ्या भाषा बोलतो आणि १० भाषा मला समजतात. मला कधीच त्या भाषा शिकण्यासाठी सक्ती केली गेली नव्हती आणि हे असंच असलं पाहिजे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. पण कोणत्याही भाषेची सक्ती केली नाही पाहिजे.’