मुंबई: देशात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी समोर येत असताना, ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असतानाही ईव्हीएमचा अट्टाहास कशासाठी? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसने उपस्थित केला आहे.
मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना भारतात निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम मशीन रशियातून नियंत्रित केल्या जात आहेत, असा खळबळजनक आरोप चंद्राबाबू नायडू केला होता. तसेच, आपण अनेक मतदारसंघात फिरलो असता लोकांचे मत सरकारविरोधी असल्याचे लक्षात आले. पण ईव्हीएम मशीन हॅक करुन, किंवा ईव्हीएम मशीनमध्ये घोळ करून सत्ताधारी मते मिळवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत खा. शरद पवार यांनी व्यक्त केले होते. आता पुन्हा एका राष्ट्रवादीने ईव्हीएमबाबत शंका उपस्थित केली आहे.
देशात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याच्या तक्रारी समोर येत असताना, ईव्हीएम हॅक होण्याची शक्यता असतानाही ईव्हीएमचा अट्टाहास कशासाठी??#LoksabhaElections2019 #EVM @BJP4India @BJP4India @narendramodi pic.twitter.com/aZPNSrhcLG
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 8, 2019