नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठीची अधिसुचना आज जारी करण्यात आली. या टप्प्यात 19 मे रोजी 59 मतदार संघात मतदान होत आहे. आत्तापर्यंत दोन टप्प्यांतील मतदानाची प्रक्रिया पुर्ण झाली असून तिसऱ्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे.
शेवटच्या टप्प्यात ज्या 59 मतदार संघात मतदान होत आहे त्यात पंजाब मधील सर्व 13 जागा, हिमाचल प्रदेशातील चार आणि चंदीगड मधील एकमेव जागेचा समावेश आहे. या मतदार संघासाठीची अधिसूचना जारी झाल्याने आता तेथे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 29 एप्रिल पर्यंत हे अर्ज दाखल करता येणार आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यातील जागांसाठीचे मतदान सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असून शेवटच्या टप्प्यात या राज्यांतील महत्वाच्या मतदार संघांचाही समावेश असणार आहे.