खटाव (प्रतिनिधी) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी खटाव येथील शिवजयंती उत्सव समिती व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे युवा सदस्य गेल्या काही वर्षांपासून नित्यनेमाने धर्मवीर बलिदान मास पाळत आहेत. यंदा 10 मार्च ते 8 एप्रिल (फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या) या चाळीस दिवसांत बलिदान मास पाळला जात आहे.
या काळात आपल्या कोणत्याही एका सुखाचा त्याग युवक करतात.त्यांनी सांगितले की, संपूर्ण बलिदान मासात सूतक पाळून, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. त्याचबरोबर घरात संभाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर तेलाचा दिवा अखंड तेवत ठेवला जातो.
दररोज सकाळी त्यांच्या प्रतिमेला फुले वाहून, ध्येयमंत्र व प्रेरणामंत्र म्हटला जातो. शेवटच्या दिवशी उपवास करून, संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाते. खटाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोज सायंकाळी युवक एकत्र येऊन संभाजी महाराजांचा जयघोष करत आहेत.