Shri Mahakaleshwar Mandir Ujjain – देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक उज्जैन येथे कालभैरव मंदिराच्या (शंकर) दर्शनासाठी येत असतात. मात्र येथे आलेल्या भाविकांवर दुकानदारांनी गुंडागिरी करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. । Shri Mahakaleshwar Mandir Ujjain
विशेष म्हणजे मुंबईतील एका कुटुंबासोबत ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. प्रसाद खरेदी न केल्याने दुकानदार आणि त्याच्या साथीदाराने मिळून मुंबईतील एका कुंटुंबीयांना मारहाण केली. या कुटुंबातील एक व्यक्ती ही सर्वोच्च न्यायालयाचे वकील आहेत.
या वकिलाला लोखंडी रॉडचा वापर करून मारहाण करण्यात आली. तसेच, गाडीत बसलेल्या एका महिलेला तिचे केस पकडून तिला बाहेर खेचले असून मुलींची छेड काढल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली. या मारहाणीत जखमी झालेल्या कुटुंबातील तीन जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. । Shri Mahakaleshwar Mandir Ujjain
मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे वकील अमरदीप भट्टाचार्य हे मुंबईतील बोरिवली पश्चिम येथील रहिवासी आहेत. त्यांचे कुटुंबीयांनी रविवारी कालभैरव मंदिरात भस्म आरतीला हजेरी लावली होती. त्यानंतर येथील दुकानदार राजा भाटी यांनी वकील अमरदीप भट्टाचार्य यांना प्रसाद खरेदी करण्यास सांगितले.
पण अमरदीप यांनी प्रसाद घेण्यास नकार दिला. त्यावेळी दुकानदार राजा भाटी याने वकिलांना तुम्ही गाडी येथेच लावली आहे. त्यामुळे पुढे जायचे असेल तर प्रसाद खरेदी करावा लागेल, अशा शब्दांत धमकी देत त्यांच्यावर बळजबरी केली. पण दुकानदाराच्या धमकीला न जुमानता अमरदीप आणि त्यांचे कुटुंबीय त्यांची गाडी घेऊन तेथून निघाले.
तितक्यात दुकानदाराने प्रसाद जबरदस्तीने त्यांच्या गाडीत टाकला आणि प्रसादाचे 200 रुपये मागू लागला. त्यावेळी अमरदीप यांनी त्या दुकानदाराला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण दुकानदार ऐकायलाच तयार नव्हता. त्यावेळी दुकानदारासोबत भक्ताचा वाद झाल्याचे पाहून जवळच्या दुकानदारांनी आणि त्यांच्या साथीदारांनी अमरदीप यांच्या वाहनाला घेराव घालत त्यांना मारहाण केली.