नवी दिल्ली – डिजिटल फ्रॉड ही आज मोठी समस्या बनली आहे. सायबर गुन्हेगार काही मिनिटांत लोकांकडून लाखो रुपये लुटतात. अशा स्थितीत डिजिटल फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आतापर्यंत दीड लाख मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत.
वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत बैठक झाली. एपीआय (एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) इंटिग्रेशनद्वारे सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम प्लॅटफॉर्मवर बँका आणि वित्तीय संस्थांच्या ऑनबोर्डिंगसह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
निवेदनानुसार, सिटीझन फायनान्शिअल सायबर फ्रॉड इन्फॉर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम प्लॅटफॉर्म आता नॅशनल सायबर क्राइम इन्फॉर्मेशन पोर्टलशी जोडला जाईल. यामुळे पोलीस, बँका आणि वित्तीय संस्था यांच्यात चांगला समन्वय साधता येईल.
दूरसंचार विभागाने बल्क एसएमएस पाठविणाऱ्या ३५ लाख प्राथमिक युनिट्सचे विश्लेषण केले. यापैकी १९७७६ खोटे एसएमएस पाठवणाऱ्या संस्थांना ‘ब्लॅकलिस्ट’ करण्यात आले आहे. या संदर्भात ५०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली असून अंदाजे ३.०८ लाख सिम ब्लॉक करण्यात आली आहेत.