India vs England 2nd Test : विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. यासह पाच सामन्यांच्या मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि जसप्रीत बुमराह हे भारताच्या विजयाचे हिरो ठरले. बेन स्टोक्सचा संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात हरला असला तरी त्याच्या संघाच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे.
भारताने दिलेल्या 399 धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संघ 292 धावांत गडगडला. मात्र, यासह इंग्लिश संघाच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली. भारतामध्ये (भारतीय मैदानावर) चौथ्या डावात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंड आता दुसरा देश बनला आहे. या बाबतीत इंग्लंडने वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडला मागे टाकले आहे.
भारतामध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर आहे. 2017 मध्ये, श्रीलंकेने दिल्ली भारतातील कसोटीच्या चौथ्या डावात 299 धावा करून सामना अनिर्णित सोडवला होता. आता या यादीत इंग्लंड 292 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज 276 धावांसह तिसऱ्या तर न्यूझीलंड 272 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
WTC : इंग्लंडला हरवून भारताने WTC पॉइंट टेबलमध्ये घेतली मोठी झेप, जाणून घ्या किती झाला फायदा…
दरम्यान, विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडचा 106 धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने मालिकेत1-1 अशी बरोबरी साधली. इंग्लंडने पहिला कसोटी सामना 28 धावांनी जिंकला होता. आता पुढील तिसरी कसोटी 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये खेळवली जाणार आहे.