नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळताना दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या निर्णयाच्या विरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. त्यातच काल अर्ध्या रात्री दिल्लीतील लाल किल्ल्यावर काँग्रेस पक्षाकडून निदर्शने करण्यात आली. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाली. दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसतर्फे मशाल शांतता पदयात्रा काढण्यात आली. मात्र पोलिसांकडून या पदयात्रेला रोखण्यात आले. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या कारवाईनंतरही आंदोलक घटनास्थळावरून न हटता बॅरिकेडजवळच धरणे धरून बसले. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
हर कदम पर हमें रोकने और हमारी आवाज को दबाने की खोखली कोशिशें इस बात का सबूत है कि-
तानाशाह डरा हुआ है, घबराया हुआ है।
हमारे सच से बौखलाया हुआ है।लेकिन हम किसी भी कीमत पर हार नहीं मानेंगे।
तानाशाह हारेगा, लोकतंत्र की जीत होगी। pic.twitter.com/izw0hvK3p2— Congress (@INCIndia) March 28, 2023
दरम्यान, या कारवाईत टीएन प्रतापन, जेपी अग्रवाल, हरीश रावत आणि शक्ती सिंह गोहिल यांच्यासह सुमारे 100 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी आंदोलकांनी ताब्यात घेतल्याचादेखील निषेध व्यक्त केला.
पोलिसांनी अनेक काँग्रेस नेत्यांना ताब्यात घेतले. या घटनेबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने ट्विटरवर निषेध नोंदवत, प्रत्येक पावलावर आम्हाला रोखण्याचा आणि आमचा आवाज दाबण्याचा पोकळ प्रयत्न करण्यात येत आहे. हा हुकूमशहा घाबरलेला आणि घाबरलेला असल्याचा पुरावा देत आहे. आमच्या सत्याने हैराण झालो. पण आम्ही कोणत्याही किंमतीत हार मानणार नाही. हुकूमशहा हरेल, लोकशाही जिंकेल.असे म्हटले आहे.