जळगाव : राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सत्ताबदलाबाबत मोठा गौप्यस्फोट केला. यामुळे सध्या सावंत चांगलेच चर्चेत आले आहे. अशात सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे एका कार्यक्रमात सावंत यांनी आपल्या सभांना शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी जमल्याचा दावा केला आहे. यावर आता शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील म्हणाले,’देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंड केलं होतं, हे तानाजी सावंतांनी हे खरं वक्तव्य केलं आहे”, असं जयंत पाटील म्हणाले. तानाजी सावंत हे खरं बोलताय, असंही देखील यावेळी जयंत पाटील म्हणाले. शिंदे गट भाजपसोबत गेल्यामुळे शिंदे गटाचं तर रेटिंग कमीच आहे. पण असंगाशी संग केल्यामुळे भाजपचं पण रेटिंग लोकप्रियता घसरली आहे, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पुन्हा दौऱ्यादरम्यान चाळीसगाव येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधून मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत आपली बाजू मांडली आहे. पक्षासाठी अधिक चांगली वेळ आणण्यासाठी सगळ्या वर्गातून प्रयत्न करायला हवेत. ही जागा आपली जाता कामा नये याची काळजी आपण घ्यायची आहे, असे आवाहन जयंत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.