मुंबई – आसाम सरकारने एक जाहीरात प्रसिद्ध केली आहे. 6वं ज्योतिर्लिंग आसाममध्ये आहे अशी जाहिरात आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलीय. या जाहीरातीवरुन आता नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे, याच वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिंदे फडणवीस सरकारला सुनावले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “श्रीमद् आद्य शंकराचार्य आपल्या बृहद रत्नाकर स्तोत्रामध्ये स्पष्टपणे म्हणतात की, भीमा नदीचा उगम आणि डाकिनीचे जंगल हेच भीमाशंकर ज्योतिर्लिंग आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर हेच १२ ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे, अन्य कोणतेही नाही.”
मुख्यमंत्र्यांना हरकत नोंदवण्याची विनंती
दरम्यान, सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी राज्याचा सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वारसा जपण्यासाठी या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. या विषयाबाबत आसामच्या मुख्यमंत्र्यांना वस्तुस्थिती कळवून आपली हरकत नोंदवावी. असेही त्या म्हणाल्या आहे.
सुप्रिया सुळे यांचे ट्विट
श्री शिवशंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणून महाराष्ट्रातील ‘भीमाशंकर’ जि. पुणे, हे ज्योतिर्लिंग ओळखले जाते.अतिशय निसर्गरम्य परिसरात वसलेले हे शिवालय अगणित भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
— Supriya Sule (@supriya_sule) February 14, 2023