सोलापूर – कालिचरण महाराज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील एका एका विधानामुळे कालिचरण महाराज चांगलेच चर्चेत आले आहेत. ‘हिंदूंनो वोट बॅंक बणा आणि राजकारणाचं हिंदूकरण करा’ असं आवाहन केलं आहे. सोलापुरातील एका कार्यक्रमानंतर बोलताना महाराजांनी राजकारण आणि हिंदू यावर भाष्य केलं.
आपल्या विधानांमुळे कालिचरण महाराज अनेकदा अडचणीत देखील आले आहेत. अशा विधानांमुळेच ते वारंवार चर्चेत असतात. सोलापुरात बोलताना ते म्हणले, “राजकारणाचे हिंदूकरण करण्याचा प्रयत्न करा, हिंदू जातीवाद वर्णवादी,भाषावाद सोडून हिंदू वोटर बनले तरच हिंदूंचं अस्तित्व टिकेल”. तसेच राजा कट्टर असेल तरच हिंदुत्वाचा रक्षण होईल असंही कालिचरण महाराज यावेळी म्हणले.
रामराज्य हवे असेल तर राजा राम पाहिजे,धर्म राज्यासाठी राजा धर्म पाहिजे. हिंदुत्वाचा कल्याण करायचं असेल आणि कोणत्याही कायद्याला मंजुरी हवी असेल तर हिंदूंनो वोटर बँक बना तरच तुमचं महत्व राजांच्या लक्षात येईल असं आवाहन देखील यावेळी कालिचरण महाराज यांनी केलं.
“तुम्ही वोटर बँक नसाल तर राजा लोक तुमच्याकडे अजिबात लक्ष देणार नाही. त्यामुळे हिंदुंनी सावध होऊन राजकारणाचं हिंदूकरण केलं पाहिजे” असं स्पष्ट मत देखील यावेळी कालिचरण महाराजांनी व्यक्त केलं. लव जिहाद विरोधी कायदा व्हावा यासाठी सर्वच संघटना मोर्चे काढत असल्याचे देखील यावेळी कालिचरण महाराजांनी यावेळी सांगितले.