अमरावती : राज्यात सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अश्यातच लव जिहाद अंतर्गत पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी 24 तासांच्या आत शोध घेऊन तीला परत आणले. ही उल्लेखनीय कामगिरी राजापेठ पोलिसांनी केली. त्याबद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी आज अमरावतीच्या पोलीस आयुक्तांसह सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिवाळीच्या सणादरम्यान चार दिवसांपूर्वी एक गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या तर परवा एक राजापेठ पोलिसांच्या हद्दीतील मुलीला पळवून नेण्यात आले होते. यातील एक मुलगी अल्पवयीन होती. याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल होताच अमरावती पोलिसांनी मुली शोधल्या व परत आणल्या.
दोन्ही घटनेतील अल्तामेश आणि शाहरुख पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. अमरावती पोलिसांनी दोन कुटुंबातील लक्ष्मी दिवाळीला परत आणल्या त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर आणि त्यांच्या पथकाने शिताफीने आरोपी शोधून काढून तात्काळ त्यास इंदोर येथे अटक केली. या उल्लेखनीय कामगिरी बद्दल भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज राजापेठ पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त विक्रम साळी, राजापेठच्या पोलीस निरीक्षक सीमा दाताळकर यांचे अभिनंदन केले.