मुंबई – राहुल गांधींच्या नेतृत्वात सुरु झालेली ‘भारत जोडो यात्रा जम्मूमध्ये दाखल होत आहे. राहुल गांधींसोबत या यात्रेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत थेट जम्मूतून सामील झाले. यावेळी राऊत यांनी शिवसेना जम्मूमध्ये देखील विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. “यानंतर अहो आधी कलानगरच्या अंगणात तरी दिवे लावा” असा टोला लगावत भाजप नेते अयुल भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे.
अतुल भातखळकर हे आपल्या पक्षाची बाजू मांडण्यासाठी सक्रियरित्या सोशल मीडियावरून विरोधकांवर निशाणा साधत असतात. ठाकरेंची शिवसेना जम्मूमध्ये देखील विधानसभा लढवणार असल्याचे राऊत यांनी जाहीर करताच भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात,”अहो आधी कलानगरच्या अंगणात तरी दिवे लावा, वांद्रातून जिंकण्याची औकात नाही, जम्मुमध्ये कुठे उजेड पाडताय?”.
https://www.dainikprabhat.com/wp-content/uploads/2023/01/bhat.jpeg
काय म्हणाले होते संजय राऊत
माध्यमांशी बोलताना खासदार राऊत यांनी जम्मूतील निवडणुकांबाबत भाष्य केले. एखाद्या पक्षाचा विरोध करण्याचा प्रश्न नाही,काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून देशातील महत्वाचा पक्ष आहे. लोक राहुल गांधींच्या नेतृत्वाला स्वीकारत असल्याचे देखील राऊत यांनी यावेळी सांगितले. भारत जोडो यात्रेत चांगले वातावरण आहे यामुळे देशात देखील चांगला संदेश जात आहे असंही राऊत जम्मूमध्ये यात्रेत सामील होताना यावेळी म्हणाले. तसेच शिवसेना जम्मूमधून देखील विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी संजय राऊत यांनी जाहीर केले.