Virat Kohli – भारत आणि श्रीलंका यांच्यात आज गुवाहाटी येथे मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांची दमदार कामगिरी पाहायला मिळाली. नाणेफेक जिंकल्यानंतर श्रीलंकेने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारतानेही पाहुण्या संघासमोर मोठ्या धावसंख्येचे आव्हान ठेवले आहे. भारताने ५० षटकांत ७ गडी गमावून ३७३ धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात श्रीलंका संघ २८ षटकांत १५१ धावांवर ४ गडी बाद अशा स्थितीत आहे.
विराटच्या धडाकेबाज खेळीने मोडला सचिनचा ‘हा’ मोठा रेकॉर्ड; बनला जगातील अव्वल!
दरम्यान, भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विन याने आजचा सामना सुरु झाल्यानंतर काही वेळात केलेले एक ट्विट आता चांगलेच व्हायरल होत आहे. अश्विनने विराट मैदानावर उतारण्याअगोदरच त्याच्या शतकीय खेळीबाबत भविष्यवाणी केली होती. विराटच्या ७३व्या शतकासह भारतीय संघ ४०० धावांच्या पार मजल मारेल का? असा सवाल त्याने ट्विटरवर विचारला होता. विराटच्या शतकाचे ट्विट खरे ठरले. पण भारताला मात्र ४०० डावांचा टप्पा गाठता आला नाही. मजल मारता आली नाही.
Let’s take a guess, how many of you think that we are going to score 400+ with a 73rd for @imVkohli ? #INDvSL
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) January 10, 2023
भारताकडून सलामीला कर्णधार रोहित शर्मा (८३ धावा) आणि शुबमन गिल (७० धावा) यांनी दमदार सुरूवात करून दिली. त्यानंतर विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील सलग दुसरे शतक झळकावले. यासह त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४५वे शतक गाठले आहे. विराट कोहलीने आजच्या या खेळीने अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच विराट कोहलीच्या बॅटमधून अशी खेळी येणे भारतासाठी आनंदाची बाब आहे. भारताला यंदाच्या वर्षात मायदेशात एकदिवसीय विश्वचषक खेळायचा आहे. त्यामुळे विराट कोहली चांगल्या लयीत असणे अत्यंत महत्वाचे आहे.