हडपसर – जागतिकीकरणाणे गावगाडा मोडून पडला आहे. आज रिकाम्या झालेल्या माणसांसमोर जगण्याचे प्रश्न निर्माण झालेत. त्याचे चित्रण करणारे व विद्रोही साहित्य मोठ्याप्रमाणात निर्माण झाले. मात्र, प्रश्न काही सुटले नाहीत. रचनात्मक कृती कार्यक्रम असेल तर विद्रोह फलद्रुप ठरतो अन्यथा तो वांझोटाच राहतो. त्यासाठी साहित्यिकांनी वेदना मांडताना त्याची उकल कशी होईल, याकडेही पाहिले पाहिजे.’ अशी अपेक्षा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनच्या उपनेत्या ॲड. सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
गावकऱ्यांनी 21 वर्षीय तरूणीला केले सरपंच; शुभेच्छांचा वर्षाव
येथील साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित साने गुरुजी वाचनालयाच्या वतीने आयोजित डॉ. लोहिया -जयप्रकाश व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प ॲड. सुषमा अंधारे यांनी गुंफले. त्यावेळी “साहित्यातील जमातवादाचे सर्वंकष चित्रण’ या विषयावर त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष आमदार चेतन तुपे पाटील, चिटणीस वसंत न्हावले, कार्याध्यक्ष जानकू कदम, कार्यवाह पांडुरंग भुजबळ, तसेच रघुनाथ ससाणे आदीसह पदाधिकारी व श्रोते यावेळी उपस्थित होते.
ॲड. अंधारे म्हणाल्या की, “प्रत्येक धर्माचे प्रयोजन माणसाच्या भल्यासाठी आहे. मात्र, मध्यस्थांनी आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली नाही. माणसांमाणसात तेढ निर्माण होण्यास मदत झाली. धर्माच्या संदर्भाने विकसीत झालेल्या साहित्यातही खऱ्या मानव मुक्तीची उणीव जाणवत आहे. काही अपवाद वगळता आजपर्यंतच्या साहित्यानेही केवळ सामाजिक समस्या मांडल्या. मात्र, या समस्यांची उकल साहित्यातून करण्यात आली नाही.