ढाका – बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्याला काही तास बाकी असतानाच भारतीय संघ व्यवस्थापनाने यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला रिलीज केले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या तसेच काही प्रश्नही निर्माण झाले होते. पंतला वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यामुळेच रिलीज केल्याचा खुलासा संघ व्यवस्थपाने केला आहे.
#BANvsIND | टीम इंडियासाठी ‘करो या मारो’, बांगलादेशविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना
पंत बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. गेल्या काही काळापासून त्याची कामगिरी अत्यंत सुमार होत होती व त्यामुळेच त्याला बाहेरचा रस्ता दाखवणतआ ल्याचे बोलले जात होते. मात्र, संघ व्यवस्थापनाने हे वृत्त फेटाळले आहे. पंतने स्वतः संघ व्यवस्थापनाकडे रिलीज करण्याची मागणी केली होती, अशीही चर्चा आहे.
#BANvsIND | टीम इंडियासाठी ‘करो या मारो’, बांगलादेशविरुद्ध उद्या दुसरा एकदिवसीय सामना
या पहिल्या सामन्यात पंतच्या जागी लोकेश राहुलला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संघात घेतले गेले. त्याने मेहदी हसनचा सोपा झेल सोडला व भारताने हा सामना गमावला. आता संघ निवडीवरही सातत्याने टीका होत आहे. नियमित यष्टीरक्षक व सलामीचा फलंदाज इशान किशनला सातत्याने का बाहेर ठेवले जाते अशीही विचारणा सध्या टीकाकार करत आहेत.
कसोटी मालिकेसाठी परतणार का
पंतला जरी रिलीज केले असले तरीही तो दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात परत येऊ शकतो असे संकेत मिळत आहेत. या मालिकेला येत्या 14 डिसेंबरपासून सुरूवात होत आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयने अद्याप कोणतेही मत व्यक्त केलेले नाही.