ढाका – भारताचा यजमान बांगलादेशविरुद्ध उद्या (बुधवार) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा ( BAN vs IND ) सामना होत आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशने भारताचा 1 गडी राखून अविश्वसनीय पराभव केला होता. या सामन्यात भारतीय फलंदाजांच्या सरस कामगिरी करत मालिकेत बरोबरी करण्याची संधी आहे.
#SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव
पहिल्या ( BAN vs IND ) सामन्यात लोकेश राहुलने फलंदाजीत चांगली कामगिरी केली मात्र, बदली यष्टीरक्षक म्हणून त्याने निराशा केली. त्याने मेहदी हसनचा सोपा झेल सोडला व त्यानेच बांगलादेशला विजय मिळवून दिला. या सामन्यात तरी अशा चुका टाळण्यात भारतीय संघ यशस्वी ठरेल का याची उत्सूकता निर्माण झाली आहे.
#SuryakumarYadav | रोहित शर्माच्या नव्हे तर ‘या’ खेळाडूच्या नेतृत्वात खेळणार सूर्यकुमार यादव
कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, शिखऱ धवन, श्रेयस अय्यर, चीपक चहर, शार्दुल ठाकूर असे नामवंत खेळाडू सपशेल अपयशी ठरले होते. त्यांपैकी ठाकूरने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली मात्र, संघातील नवोदित गोलंदाजांनी साफ निराशा केली. बांगलादेशविरुद्ध विजयाच्या वाटेवर चालत असतानाच भारतीय संघ अडखळला. आता दुसरा सामना तरी ते जिंकत मालिकेत बरोबरी करणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
संघाबाहेर बसवण्यात आलेल्या उमरान मलिक, इशान किशन, राहुल त्रपाठी व रजत पाटीदार यांना ( BAN vs IND ) या सामन्यात संधी मिळणार का हे पाहणेही महत्वाचे ठरेल. दुसरीकडे बांगलादेशचा संघही दुसरा सामना जिंकत मालिका विजय साकार करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यांनाही प्रमुख फलंदाजांच्या अपयशाची चिंता असली तरीही त्यांचे गोलंदाज पहिल्या सामन्यात शिरजोर ठरले होते त्यामुळे या सामन्यातही त्यांची विजयाची मदार फिरकी गोलंदाज व माजी कर्णधार शकिब अल हसन आणि इबादत हुसेन यांच्यावरच राहणार आहे.