BAN vs IND – बांगलादेशचा अनुभवी फिरकी गोलंदाज शकीब अल हसनने भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (BAN vs IND) दमदार गोलंदाजी केली. या सामन्यात शाकिबच्या गोलंदाजीला खेळताना भारतीय फलंदाज असहाय्य असेच दिसत होते. शाकिबला खेळपट्टी चांगली साथ देत आणि त्यामुळे भारतीय फलंदाज त्याच्या जाळ्यात अडकले. या सामन्यावर आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने भारतीय संघावर टीका करताना म्हटले की, ‘शाकिबला कसे खेळायचे हे लहान मुलांनाही माहीत आहे, पण भारतीय खेळाडू त्याला खेळू शकले नाहीत.’
#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!
मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाने भारताचा १ गडी राखून पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीला नेणफेक जिनकुन बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याच्या करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने पहिल्या डावात ४१.२ षटकांत केवळ १८६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर बांगलादेश संघाने ४६ षटकांत ९ गडी गमावून विजय मिळवला. बांगलादेशकडून शाकिब हल हसनने जबरदस्त गोलंदाजी करत सामन्यात ५ बळी घेतले. यादरम्यान शाकिबने १० षटकांत केवळ ३६ धावा दिल्या आणि दोन मेडन षटक देखील टाकले.
#BANvsIND | विराट कोहलीचा ‘तो’ कॅच पाहून सगळेच शॉक; फलंदाजाला तर विश्वासच बसेना!
शाकिब हल हसनच्या गोलंदाजीत कामगिरी नंतर दानिश कनेरियाने भारतीय फलंदाजांवर निशाणा साधला. तो म्हणाला की, “शाकिब अल हसनने गोलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. तो इतकी वर्षे आयपीएलमध्ये खेळत असूनही तो कसा गोलंदाजी करतो हे भारतीय फलंदाजांना माहीत नाही. तो क्वचितच चेंडू वळवण्याचा प्रयत्न करतो. अगदी लहान मुलांनाही शाकिबची गोलंदाजी माहित आहे पण भारतीय फलंदाजांना नाही.”
दानिश कनेरियाने भारतीय क्रिकेट दिवसेंदिवस कमकुवत होत असल्याचे म्हटले आहे. तो पुढे बोलताना म्हणाला की, “भारताकडे सत्ता आणि पैसा असेल पण त्यांचे क्रिकेट खालच्या स्थराला जात आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकात पावसामुळे भारताला लिटन दासपासून वाचवले पण बांगलादेशने त्यांच्या आता घरच्या मैदानावर बदला घेतला आहे.”